महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरणातील प्रमुख बाबी
- 'राज्य सांस्कृतिक निधी' ची स्थापना. - शासकीय अर्थसहाय्य आणि लोकसहभाग यातून; या निधीतून केवळ शासकीय तरतुदींतून सहजगत्या न राबविता येणाऱ्या योजना /उपक्रम राबविले जातील.
- मराठी भाषा विभाग स्थापन केला जाईल.
- भाषा सल्लागार मंडळ स्थापन होणार.
- मुंबईत भाषाभवन उभे राहणार.- भाषा आणि साहित्यविषयक उपक्रम राबविण्यासाठी.
- मराठीसाठी 'प्रमाण भाषा कोश ' मंडळ स्थापन होणार.
- प्रत्येक तालुक्यात एक खुले नाट्यगृह.
- जिल्हा पातळीवर खाजगी सहकार्याने नाट्यगृह.
- मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज (नियोजित स्थळ: अरबी समुद्रात), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चैत्यभूमी ), महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांचे स्मारक उभे राहणार.
- प्रत्येक महसुली विभागात, विभागीय पातळीवर 'कलासंकुल' उभे करणार.
- साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक किंवा त्यांच्या नावाने अध्यासन रशियात स्थापण्याचा प्रयत्न करणार.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कोलंबिया विद्यापीठ (अमेरिकेत) तर महर्षी वि.रा.शिंदे यांच्या नावाने ऑक्सफर्ड (ब्रिटन ) विद्यापीठात अध्यासन निर्माण करण्यात शासन प्रयत्न करेल.
- शिवकालीन किल्ल्यांच्या ठिकाणी "शिवकिल्ले मालिका योजना " तयार करणार.
- पैठण येथे संतपीठ
- महाराष्ट्र ललित कला अकादमीची स्थापना.
- मराठी बोली भाषा अकादमी उभारणार.
- महाराष्ट्र प्रगत अध्ययन केंद्र नावाची स्वायत्त संस्था उभी राहणार- 'महाराष्ट्रविद्या' या नवीन ज्ञानशाखेच्या अभ्यासासाठी.