प्रश्नसंच - २५ [भूगोल]

प्र.१} दख्खन पठाराची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झाली ?

A. भेगी उद्रेक
B. भूकंप
C. समांतर हालचाली
D. यापैकी नाही


A. भेगी उद्रेक

प्र.२} महाराष्ट्राची पूर्वेकडील नैसर्गिक सीमा ओळखा.

A. गारो, खासी, जैतीया
B. भामरागड-चिरोलि-गायखुरी
C. सातमाळा
D. मेळघाट


B. भामरागड-चिरोलि-गायखुरी

प्र.३} चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या प्रकारचे लोहखनिज आढळते ?

A. लिग्नाईट
B. मॅग्नेटाईट
C. हेमेटाईट
D. सिडेराईट


C. हेमेटाईट

प्र.४} महाराष्ट्र पठारावरील अवर्षणग्रस्त प्रदेशात पावसाचे प्रमाण किती दरम्यान आहे ?

A. २५ ते ६० सेमी
B. ५० ते ७५ सेमी
C. ३० ते ८० सेमी
D. २५ ते ५० सेमी


D. २५ ते ५० सेमी

प्र.५} उत्तर गोलार्धात दिनमानाचा कालावधी कधीपासून वाढत जातो ?

A. २२ जून
B. २१ मार्च
C. २२ मार्च
D. २१ जून


B. २१ मार्च

प्र.६} सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्यावर उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण _ _ _ _ _.

A. तेवढेच राहते.
B. वाढत जाते.
C. कमी होत जाते.
D. फारसा फरक पडत नाही.


B. वाढत जाते.

प्र.७} तौला शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. नाशिक
B. पुणे
C. धुळे
D. नंदुरबार


D. वरील सर्व

प्र.८} शेत जमिनीचा कमाल वापर व अधिक काल शेती हा मुख्य उद्देश कशाचा आहे ?

A. वृक्षारोपण
B. वन शेती
C. शेती योजना
D. सामाजिक वनीकरण


B. वन शेती

प्र.९} उसाचे आडसाली पिक किती महिन्यांनी तयार होते ?

A. १५
B. १८
C. २४
D. १२


B. १८

प्र.१०} सन १९५१ मध्ये मुंबई राज्यात एकूण किती जिल्हे होते ?

A. २८
B. ३२
C. ३८
D. ४६


A. २८
Previous Post Next Post