प्रश्नसंच - ३३ [पंचायत राज]

प्र १.} त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेतील कोणत्या स्तराला वसंतराव नाईक समितीने जास्त महत्व दिले ?

A. जिल्हा परिषद
B. पंचायत समिती
C. ग्रामपंचायत
D. ग्रामसभा


A. जिल्हा परिषद

प्र २.} ग्रामपंचायतीची कमीत कमी सदस्य संख्या किती असू शकते ?

A. ५
B. ७
C. ९
D. १०


B. ७

प्र ३.} द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली ?

A. वसंतराव नाईक
B. बलवंतराय मेहता
C. पी.बी.पाटील
D. अशोक मेहता


D. अशोक मेहता

प्र ४.} प्रशासकीय सुधारणा आयोगाने खालीलपैकी कोणत्याशिफारसी केल्या होत्या ?

अ] पंचायत राज व्यवस्थेमध्ये जिल्हा या स्तराला जास्त महत्व असावे.
ब] ग्रामसभेच्या वर्षातून किमान २ बैठका व्हाव्यात.
क] ग्रामपंचायतीचे सदस्य हे पंचायत समितीचे पदसिद्ध सदस्य असावे.

पर्याय
A. फक्त अ
B. फक्त अ व ब
C. फक्त अ व क
D. वरील सर्व


D. वरील सर्व

प्र ५.} त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेतील कोणत्या स्तराला बलवंतराय मेहता समितीने जास्त महत्व दिले ?

A. जिल्हा परिषद
B. पंचायत समिती
C. ग्रामपंचायत
D. ग्रामसभा


B. पंचायत समिती

प्र ६.} पंचायत समितीमध्ये अप्रत्यक्ष निवडणुकीच्या तत्वाऐवजी प्रत्यक्ष निवडणुकीच्या तत्वाचा वापर करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली ?

A. अशोक मेहता
B. वसंतराव नाईक
C. ल.ना.बोंगिरवार
D. पी.बी.पाटील


C. ल.ना.बोंगिरवार

प्र ७.} 'प्रौढ शिक्षण कार्यक्रम जिल्हा परिषदेकडे सोपविण्यात यावा' अशी शिफारस कोणत्या समितीने केली ?

A. वसंतराव नाईक
B. बलवंतराय मेहता
C. पी.बी.पाटील
D. अशोक मेहता


D. अशोक मेहता

प्र ८.} पी.बी.पाटील समितीने सरपंचाच्या एकूण जागेपैकी किती टक्के जागा स्त्रियांसाठी राखीव ठेवण्याची शिफारस केली ?

A. ५०%
B. २५%
C. २७%
D. ३३%


B. २५%

प्र ९.} वसंतराव नाईक समितीने आपला अहवाल राज्य शासनाला कधी सादर केला ?

A. १६ जून १९६२
B. १५ मार्च १९६१
C. २४ डिसेंबर १९६१
D. २ ऑक्टोबर १९६२


B. १५ मार्च १९६१

प्र १०.} अशोक मेहता समितीच्या स्थापनेचा उद्देश खालीलपैकी कोणता होता ?

अ] पंचायत राजमध्ये ग्रामीण जनतेचा सहभाग वाढविणे.
ब] पंचायत राजचे मूल्यमापन करणे.
क] पंचायत राज व्यवस्थेचे मूल्यमापन करणे.

पर्याय
A. फक्त अ
B. फक्त अ व ब
C. फक्त अ व क
D. वरील सर्व


D. वरील सर्व
Previous Post Next Post