Home प्रश्नसंच - ४५ [पंचायत राज] bySunil Jadhavar •February 14, 2014 0 प्र १.} स्थानिक स्वराज्य संस्था सुरु करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ? A. महाराष्ट्र B. उत्तर प्रदेश C. मध्य प्रदेश D. राजस्थान उत्तरासाठी येथे क्लिक करा. D. राजस्थान प्र २.} द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली ? A. वसंतराव नाईक समिती B. अशोक मेहता समिती C. बलवंतराय मेहता समिती D. एन.डी.चेलय्या समिती उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. अशोक मेहता समिती प्र ३.} त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेतील कोणत्या स्तराला बलवंतराय मेहता समितीने जास्त महत्व दिले ? A. जिल्हा परिषद B. ग्रामपंचायत C. पंचायत समिती D. ग्रामसभा उत्तरासाठी येथे क्लिक करा. C. पंचायत समिती प्र ४.} त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेतील कोणत्या स्तराला वसंतराव नाईक समितीने जास्त महत्व दिले ? A. जिल्हा परिषद B. ग्रामपंचायत C. पंचायत समिती D. ग्रामसभा उत्तरासाठी येथे क्लिक करा. A. जिल्हा परिषद प्र ५.} 'पंचायत राजच्या विकासासाठी पंचायत समितीचे अस्तित्व आवश्यक आहे. त्यामुळे ती बरखास्त करण्यात येऊ नये' अशी शिफारस कोणत्या समितीने केली ? A. बलवंतराय मेहता समिती B. पी.बी.पाटील समिती C. ल.ना.बोंगिरवार समिती D. वसंतराव नाईक समिती उत्तरासाठी येथे क्लिक करा. C. ल.ना.बोंगिरवार समिती प्र ६.} 'ग्रामपंचायतीवर पंचायत समितीचे नियंत्रण असावे' अशी शिफारस कोणत्या समितीने केली ? A. बलवंतराय मेहता समिती B. पी.बी.पाटील समिती C. ल.ना.बोंगिरवार समिती D. वसंतराव नाईक समिती उत्तरासाठी येथे क्लिक करा. A. बलवंतराय मेहता समिती प्र ७.} ‘सहकार हा विषय जिल्हा परिषदेकडे असू नये’ अशी शिफारस कोणत्या समितीने केली ? A. अशोक मेहता समिती B. बलवंतराय मेहता समिती C. हनुमंतय्या समिती D. वसंतराव नाईक समिती उत्तरासाठी येथे क्लिक करा. A. अशोक मेहता समिती प्र ८.} न्यायपंचायत संपुष्टात आणण्याची शिफारस कोणत्या समितीने केली ? A. बाबुराव काळे समिती B. ल.ना.बोंगिरवार समिती C. पी.बी.पाटील समिती D. एल.एम.सिंघवी समिती उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. ल.ना.बोंगिरवार समिती प्र ९.} ला.ना.बोंगिरवार समितीच्या शिफारशीबाबत खालील विधाने लक्षात घ्या. अ] ५०० पेक्षा कमी लोकसंख्येसाठी ग्रामपंचायत स्थापन करू नये. ब] नियोजन कार्यासाठी उपमुख्य कार्यकारी हे पद निर्माण करण्यात यावे. वरीलपैकी कोणती शिफारस ला.ना.बोंगिरवार समितीने केली नाही? पर्यायः- A. फक्त अ B. फक्त ब C. वरील दोन्ही D. वरीलपैकी एकही नाही उत्तरासाठी येथे क्लिक करा. D. वरीलपैकी एकही नाही प्र १०.} प्रशासकीय सुधारणा आयोगाने खालीलपैकी कोणत्याशिफारसी केल्या होत्या ? अ] पंचायत राज व्यवस्थेमध्ये जिल्हा या स्तराला जास्त महत्व असावे. ब] ग्रामसभेच्या वर्षातून किमान २ बैठका व्हाव्यात. क] ग्रामपंचायतीचे सदस्य हे पंचायत समितीचे पदसिद्ध सदस्य असावे. पर्यायः- A. फक्त अ B. फक्त अ व ब C. फक्त अ व क D. वरील सर्व उत्तरासाठी येथे क्लिक करा. D. वरील सर्व Facebook Twitter