प्रश्नसंच - ४७ [राज्यघटना]

प्र १.} खालीलपैकी कोणता मुलभूत हक्क नाही ?

A. समतेचा हक्क
B. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क
C. शोषणाविरुद्धचा हक्क
D. रोजगाराचा हक्क


D. रोजगाराचा हक्क

प्र २.} खालीलपैकी कोणती भाषा घटनेच्या ८व्या परिशिष्टात समाविष्ट नाही ?

A. उर्दू
B. गुरुमुखी
C. सिंधी
D. नेपाळी


B. गुरुमुखी

प्र ३.} भारतात कोणत्या प्रकारची शासनव्यवस्था आहे ?

A. निरंकुश राजेशाही
B. अध्यक्षीय लोकशाही
C. संसदीय शासनव्यवस्था
D. संघराज्यात्मक शासनव्यवस्था


C. संसदीय शासनव्यवस्था

प्र ४.} कायदेविषयक अधिकार कोणाच्या हाती असतात ?

A. राष्ट्रपती
B. संसद
C. पंतप्रधान
D. राज्यपाल


B. संसद

प्र ५.} विधानपरिषदेतील सदस्यसंख्या कमीत कमी किती असावी लागते ?

A. ५०
B. ४०
C. ६०
D. ७०


B. ४०

प्र ६.} ४२वी घटनादुरुस्ती किती साली संमत करण्यात आली ?

A. १९७४
B. १९७५
C. १९७६
D. १९७७


C. १९७६

प्र ७.} खालीलपैकी कोणता अधिकार भारताचा नागरिक नसलेल्या लोकांनादेखील मिळतो ?

A. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार
B. संचार स्वातंत्र्याचा अधिकार
C. संपत्तीचा अधिकार
D. जीविताचा अधिकार


D. जीविताचा अधिकार

प्र ८.} खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा.

अ] गरजेनुसार विविध खात्यांची निर्मिती पंतप्रधान करतो.
ब] कॅबिनेट सचिव हा युपीएससीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो.

पर्याय:-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. दोन्ही चूक
D. एकही नाही


B. अ-क-ब-ड

प्र ९.} राष्ट्रपतीला महाभियोगाद्वारे पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

A. सर्वोच्च न्यायालय
B. मंत्रीमंडळ
C. संसद
D. लोकसभा


C. संसद

प्र १०.} मंत्रीपरिषदेविरुद्धचा अविश्वासाचा ठराव कोठे मांडला जातो ?

A. लोकसभेत
B. राज्यसभेत
C. दोन्ही सभागृहात
D. संयुक्त अधिवेशनात


A. लोकसभेत
Previous Post Next Post