प्रश्नसंच - ५० [इतिहास]

प्र १.} चोल राजांच्या संदर्भात "राजांच्या मृत्युनंतर त्याच्या चितेवर त्याचे सर्व अंगरक्षक स्वतःला जाळून घेऊन प्राणार्पण करत असत" हे विधान कोणी केले ?

A. मार्को पोलो
B. इब्न बतुता
C. अल बरुनी
D. इत्सिंग


A. मार्को पोलो

प्र २.} खालीलपैकी कोणत्या राजांकडे सर्वोत्कृष्ट घोडदळ होते ?

A. राष्ट्रकुट
B. प्रतिहार
C. पाल
D. चालुक्य


B. प्रतिहार

प्र ३.} राष्ट्रकुटांच्या राज्यात प्रांताला काय म्हणत ?

A. मंडळ
B. विषय
C. राष्ट्र
D. यापैकी नाही


C. राष्ट्र

प्र ४.} खालीलपैकी कोणत्या राष्ट्रकुट राजाने जलसमाधी घेतली ?

A. कृष्ण दुसरा
B. इंद्र तिसरा
C. कृष्ण तिसरा
D. अमोघवर्ष


D. अमोघवर्ष

प्र ५.} नालंदा विद्यापीठाचे पुनरुज्जीवन कोणी केले ?

A. भोज
B. धर्मपाल
C. देवपाल
D. नागभट्ट


B. धर्मपाल

प्र ६.} महंमद गझनीने सोमनाथवर स्वारी कधी केली ?

A. १०१५
B. १०१८
C. १०२०
D. १०२५


D. १०२५

प्र ७.} महंमद गझनीच्या दरबारी कवी कोण होता ?

A. अल बरुनी
B. फिरदौसी
C. अल मसुदी
D. सुलेमान


B. फिरदौसी

प्र ८.} चोल राजांच्या संदर्भात अयोग्य विधान ओळखा.

A. विजयालय याने चोल साम्राज्याची स्थापना केली.
B. राजराजा याने कलिंगमार्गे बंगालवर स्वारी केली.
C. राजेंद्र पहिला याने श्रीविजय साम्राज्यावर स्वारी केली.
D. चोल राजांच्या काळात तंजावर येथे मंदिर बांधले गेले.


B. राजराजा याने कलिंगमार्गे बंगालवर स्वारी केली.

प्र ९.} खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.

अ] अलवार संत हे विष्णूचे भक्त होते.
ब] नयनार संत हे विष्णूचे भक्त होते.

पर्यायः-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. एकही नाही


A. फक्त अ

प्र १०.} खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा.

अ] 'मान्यखेड' हि राष्ट्रकुट साम्राज्याची राजधानी होती.
ब] अमोघवर्षने मान्यखेड हि राजधानी वसवली.

पर्यायः-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. एकही नाही


D. एकही नाही
Previous Post Next Post