प्रश्नसंच - ५५ [इतिहास]

प्र १.} तिस-या अंग्लो-म्हैसूर युद्धात टिपू सुलतान विरुद्ध पुढीलपैकी कोणी संयुक्त फळी उभी केली ?

A. निजाम, कर्नाटकचा नवाब, इंग्रज
B. मराठे, इंग्रज, कर्नाटकचा नवाब
C. निजाम, मराठे, इंग्रज
D. त्रावणकोरचे राजे, मराठे, इंग्रज


C. निजाम, मराठे, इंग्रज

प्र २.} गोपाळ कृष्ण गोखले संबंधी पुढील विधानांचा विचार करा आणि योग्य विधाने ओळखा.

अ] १८९७ साली गोखलेंनी मॅंचेस्टर गार्डियन या वृत्तपत्रातून पुण्याच्या प्लेग कमिशनरवर टीका केली.
ब] त्या कृतीबद्दल गोखलेंनी इंग्लंडवरून भारतात परतल्यावर जाहीर माफी मागितली होती.

पर्यायः-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. अ व ब दोन्ही
D. एकही नाही


C. अ व ब दोन्ही

प्र ३.} अयोग्य विधान ओळखा.

A. १८१३च्या चार्टर कायद्याने कंपनीचे भारतीय व्यापारावरील अधिकार समाप्त झाले.
B. १७९३च्या चार्टर कायद्यान्वये कंपनीचा कार्यकाळ १० वर्षाने वाढविण्यात आला.
C. खेडा चळवळ मुंबई सरकार विरुद्ध होती.
D. १९२१मध्ये मोपला बंद आणि खिलाफत चळवळ एकमेकांत मिसळून गेले.


B. १७९३च्या चार्टर कायद्यान्वये कंपनीचा कार्यकाळ १० वर्षाने वाढविण्यात आला.

प्र ४.} खालीलपैकी मोपला बंडाचे तात्कालिक कारण कोणते ?

A. राष्ट्रीय सभेमध्ये पडलेली फुट.
B. इ.एफ.थॉमसने तिरुरांगडी येथे मशिदीत घुसून अली मुसालियरला पकडण्याचा प्रयत्न केला.
C. इंग्रजाचे खिलाफत विरोधी धोरण.
D. जमीनदारांचे मोपल्यांवरील अत्याचार


B. इ.एफ.थॉमसने तिरुरांगडी येथे मशिदीत घुसून अली मुसालियरला पकडण्याचा प्रयत्न केला.

प्र ५.} कॅबिनेट मिशन भारतात आले कारण...............

A. भारताचे सामाजिक प्रश्न सोडविण्याकरिता.
B. भारताच्या फाळणीला गती देण्याकरिता
C. भारताला सत्ता हस्तांतरित करण्याकरीता
D. राज्य घटनेच्या प्रश्नावर तोडगा काढण्याकरिता


D. राज्य घटनेच्या प्रश्नावर तोडगा काढण्याकरिता

प्र ६.} खालीलपैकी कोणती बाब असहकार चळवळीशी संबंधित नाही.

A. परकीय वस्तूंवर बहिष्कार
B. कायदा न्यायालयांवर बहिष्कार
C. इंग्रजांनी केलेल्या कायद्यांना तुच्छ मानणे.
D. भारत सरकारच्या १९१९च्या कायद्यान्तर्गत घेतलेल्या निवडणुकांवर बहिष्कार.


C. इंग्रजांनी केलेल्या कायद्यांना तुच्छ मानणे.

प्र ७.} योग्य विधाने ओळखा.

अ] डेक्कन सभेची स्थापना गोखलेंनी केली.
ब] १८९५मध्ये टिळक व त्यांच्या सहका-यांनी पुण्याच्या सार्वजनिक सभेतून गोखले व रानडे यांना बाजूला सारले.

पर्यायः-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. अ व ब दोन्ही
D. एकही नाही


C. अ व ब दोन्ही

प्र ८.} होमरूलसंबंधी अयोग्य विधाने ओळखा.

अ] भारतीयांसाठी स्वराज्य हि होमरूलची मागणी होती.
ब] मद्रासमध्ये होमरूलची स्थापना अनी बेजंट यांनी केली.
क] या चळवळीमध्ये स्त्रिया व विद्यार्थ्यांचा समावेश होता.
ड] फ्रांसच्या होमरूलच्या धर्तीवर भारतात हि चळवळ सुरु झाली.

पर्यायः-
A. फक्त क व ड
B. फक्त क
C. फक्त ड
D. वरील सर्व


C. फक्त ड

प्र ९.} १८७८च्या भारतीय वृत्तपत्र कायद्यात खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो ?

अ] भारतीय वृत्तपत्रांमधून प्रतिज्ञा घेण्यात आली कि त्यांनी सरकारविरोधी लिखाण करू नये.
ब] जिल्हा दंडाधिकारी अशा वृत्तपत्रांकडून अनामत रक्कम मागवू शकत होता.
क] दंडाधिका-यांचा निर्णय अंतिम असेल त्यावर अपील करता येणार नाही.

पर्यायः-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. ब आणि क
D. वरील सर्व


D. वरील सर्व

प्र १०.} शिक्षणाशी संबंधित हार्टोग समितीची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

A. १९१३
B. १९१७
C. १९२९
D. १९३५


C. १९२९
Previous Post Next Post