Home प्रश्नसंच - ६१ [इतिहास] bySunil Jadhavar •March 02, 2014 0 प्र १.} खालीलपैकी कोण सम्राट अशोकाचा मुलगा नव्हता ? A. तिवरा B. कुणाल C. जलौका D. सुमण उत्तरासाठी येथे क्लिक करा. D. सुमण प्र २.} आर्यभट्ट : खगोलशास्त्र : : सुश्रुत : ??? A. गणितशास्त्र B. औषधशास्त्र C. राज्यशास्त्र D. अर्थशास्त्र उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. औषधशास्त्र प्र ३.} 'मालविकाग्निमित्र' या नाटकाची रचना कोणी केली ? A. अग्निमित्र B. समुद्रगुप्त C. कालिदास D. हर्षवर्धन उत्तरासाठी येथे क्लिक करा. C. कालिदास प्र ४.} अयोग्य जोडी ओळखा. A. पहिली बौद्ध सभा : राजगृह B. दुसरी बौद्ध सभा : मगध C. तिसरी बौद्ध सभा : पाटलीपुत्र D. चौथी बौद्ध सभा : काश्मिर उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. दुसरी बौद्ध सभा : मगध प्र ५.} विक्रमादित्यच्या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती होती ? A. पुरुषपूर B. पाटलीपुत्र C. उज्जैन D. वाराणशी उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. पाटलीपुत्र प्र ६.} गुप्त काळातील चांदीच्या नाण्यांना काय नाव होते ? A. दिनार B. रुप्याका C. सतमान D. कर्शपान उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. रुप्याका प्र ७.} गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांच्यासंबंधी कोणते विधान चुकीचे आहे ? A. दोघेही एकाच शतकात जन्मले होते. B. दोघेही क्षत्रिय आहेत. C. दोघांचाही साध्या आणि नीट राहाणीमानावर विश्वास होता. D. वर्ण व्यवस्थेविषयी दोघांची मते सारखीच होती. उत्तरासाठी येथे क्लिक करा. D. वर्ण व्यवस्थेविषयी दोघांची मते सारखीच होती. प्र ८.} 'त्रिसमुद्रतोयपीतवाहन' म्हणजे ज्याचे घोडे तीनही समुद्राचे पाणी प्यायले आहेत असा उल्लेख कोणाबद्दल केला जातो? A. गौतमीपुत्र सातकर्णी B. सम्राट अशोका C. हर्षवर्धन D. विक्रमादित्य उत्तरासाठी येथे क्लिक करा. A. गौतमीपुत्र सातकर्णी प्र ९.} मौर्य साम्राज्याच्या -हासाचे खालीलपैकी कोणती कारणे सांगता येतील? अ] अशोक राजाचे शांततेचे धोरण ब] अशोका नंतरचे दुबळे शासक क] परकीय आक्रमण A. फक्त अ आणि ब B. फक्त ब आणि क C. फक्त अ आणि क D. वरील सर्व उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. फक्त ब आणि क प्र १०.} खालीलपैकी कोण कोण पल्लवांचे समकालीन होते? अ] गंग ब] कदंब क] चालुक्य ड] सातवाहन A. अ आणि ड B. अ,ब आणि क C. अ आणि क D. अ,क आणि ड उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. अ,ब आणि क Facebook Twitter