प्रश्नसंच - ७६ [अर्थशास्त्र]

प्र.१} भारतात दशमान चलन पद्धती कोणत्या कायद्याने अस्तित्वात आली ?

A. नाणे दुरुस्ती कायदा १९४८
B. नाणे दुरुस्ती कायदा  १९३५
C. नाणे दुरुस्ती कायदा  १९५५
D. नाणे दुरुस्ती कायदा १९४९


C. नाणे दुरुस्ती कायदा  १९५५

प्र.२} खालीलपैकी कोणत्या योजनेत केंद्र : राज्य वाटा ४९ : ५१ आहे ?

A. अल्पसंख्यांक विकास योजना
B. शबरी आदिवासी वित्त व विकास योजना
C. मौलाना आझाद विकास योजना
D. स्वाभिमान योजना


B. शबरी आदिवासी वित्त व विकास योजना

प्र.३} नागरी दलित वस्ती सुधार योजना कधीपासून कार्यान्वित झाली ?

A. १९९१-९२
B. १९९५-९६
C. १९९८-९९
D. २००२-०३


B. १९९५-९६

प्र.४} 'किसान जनता अपघात योजना' राज्यात पूर्वी कोणत्या नावाने कार्यरत होती ?

A. शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना
B. जीवन शेतकरी सुरक्षा योजना
C. राष्ट्रीय कृषी मालक सुरक्षा योजना
D. वरीलपैकी नाही


A. शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना

प्र.५} ग्रामीण शेतक-यांना वीज बिल भरण्यात विविध सुविधा देणारी योजना कोणती?

A. कृषी उर्जा योजना
B. कृषी संजीवनी योजना
C. उर्जा शेती योजना
D. महावितरण योजना


B. कृषी संजीवनी योजना

प्र.६} भारतीय चलनामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होत नाही ?

अ] चलनी नोटा
ब] चलनी नाणी
क] सरकारी रोखे

पर्यायः-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. फक्त क
D. फक्त ब आणि क


C. फक्त क

प्र.७} आम आदमी विमा योजनेसंबंधी खालीलपैकी योग्य विधान निवडा.

अ] अकाली मृत्यूस ३०००० रुपये आश्वासित रक्कम आहे.
ब] या योजेनेंतर्गत संपूर्ण ग्रामीण कुटुंबाचा विमा उतरविण्यात येतो.
क] अपघाती लाभ ३७५०० ते ७५००० रुपयाच्या दरम्यान मिळतो.

पर्यायः- 
A. अ आणि ब
B. ब आणि क
C. अ आणि क
D. वरील सर्व


C. अ आणि क

प्र.८} किसान क्रेडीट कार्ड योजनेसंबंधी योग्य विधाने ओळखा.

अ] हि योजना १९९९ पासून सुरु झाली.
ब] २००६-०७ पासून या योजनेंतर्गत लघु व मध्यम मुदतीची कर्जे मंजूर करण्यात येतात.

पर्यायः- 
A. फक्त अ
B. फक्त ब
C. दोन्ही योग्य
D. दोन्ही अयोग्य


A. फक्त अ
[२००६-०७ पासून या योजनेंतर्गत दीर्घ मुदतीची कर्जे मंजूर करण्यात येतात.]

प्र.९} राजीव आवास योजनेसंबंधी योग्य विधान ओळखा.

अ] या योजनेची सुरुवात २०११ साली झाली.
ब] या योजनेत ५०% वाटा केंद्राने उचलला आहे.
क] या अंतर्गत ग्रामीण गृहनिर्माणास चालना देण्यात येते.

 पर्यायः- 
A. अ आणि ब
B. ब आणि क
C. अ आणि क
D. वरील सर्व 


C. मध्यप्रदेश

प्र.१०} राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन संबंधी अयोग्य विधान ओळखा.

अ] या योजनेची सुरुवात २००७-०८ मध्ये झाली.
ब] विविध उत्पादन क्षमतांचा विकास करून उत्पादनात वाढ घडवून आणणे हा या योजनेचा उद्देश आहे.
क] या योजनेंतर्गत गहू, तांदूळ, कडधान्ये यांना महत्व देण्यात आले आहे.

  पर्यायः- 
A. फक्त अ
B. फक्त ब आणि क
C. फक्त अ आणि क
D. वरीलपैकी एकही नाही


D. वरीलपैकी एकही नाही
Previous Post Next Post