प्रश्नसंच - २१ [अर्थशास्त्र]

प्र.१} भूविकास बँकांचा भांडवल उभारणीचा सर्वात महत्वाचा स्त्रोत कोणता ?

A. ठेवी
B. भागी भांडवल
C. कर्ज घेणे
D. कर्ज रोख्यांची विक्री


D. कर्ज रोख्यांची विक्री

प्र.२} निर्यात व्यापारातील जोखीमेला विमा संरक्षण कोण देते ?

A. इ.सी.जी.सी.
B. क्रिसिल
C. एम.आय.सी.आय.एल.
D. एल.आय.सी.


A. इ.सी.जी.सी.

प्र.३} साखर कारखान्याच्या उभारणीत जागा ठरविताना कोणता घटक विशेष लक्षात घेतला जातो ?

A. उसाची उपलब्धता
B. स्वस्त कामगारांची उपलब्धता
C. उच्च तंत्रज्ञान
D. मोठे बाजार


A. उसाची उपलब्धता

प्र.४} उत्पन्न निर्धारण सिद्धांतामध्ये खालीलपैकी कशावरिल खर्च हा गुंतवणूक म्हणून ग्राह्य धरला जात नाही ?

A. कारखाना उभारणी
B. संगणक
C. विक्री न झालेल्या वस्तूमध्ये झालेली वाढ
D. सलग्न रोखे कंपनीमधील रोखे किंवा भाग


D. सलग्न रोखे कंपनीमधील रोखे किंवा भाग

प्र.५} 'आत्मनिर्भरता' या संकल्पनेत खालीलपैकी कशाचा अंतर्भाव होत नाही ?

A. सर्व प्रकारची आयात बंद करणे.
B. व्यवहार तोलामध्ये संतुलन स्थापित करणे.
C. भांडवली वस्तूंच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणे.
D. उच्च तंत्रज्ञानयुक्त मनुष्यबळामध्ये स्वयंपूर्ण होणे.


A. सर्व प्रकारची आयात बंद करणे.

प्र.६} संतुलित विकास म्हणजे .................................

A. कृषी व उद्योग क्षेत्राचा समान विकास
B. खाजगी व सार्वजनिक क्षेत्राचा समान विकास
C. आयात व निर्यात समान असणे
D. वरील सर्व


B. खाजगी व सार्वजनिक क्षेत्राचा समान विकास

प्र.७} 'लघुउद्योग' नावाचे मासिक कोणामार्फत चालविले जाते ?

A. MSSDIC
B. MIDC
C. RBI
D. SICOM


A. MSSDIC

प्र.८} खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रोखे बाजार नाही ?

A. राजकोट
B. कोईमतूर
C. झाशी
D. मंगलोर


C. झाशी

प्र.९} भारत निर्माण योजनेमध्ये पुढीलपैकी कोणता घटक अंतर्भूत नाही ?

A. ग्रामीण रस्ते
B. ग्रामीण विद्युतीकरण
C. ग्रामीण शिक्षण
D. ग्रामीण आरोग्य


C. ग्रामीण शिक्षण

प्र.१०} खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधाने ओळखा.

अ] मंदीवाले दलाल हे संभाव्य तोट्याचा विचार करून व्यवहार करतात.
ब] तेजीवाले दलाल हे संभाव्य नफ्याचा विचार करून व्यवहार करतात.

पर्याय:-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. दोन्ही योग्य
D. दोन्ही अयोग्य


D. दोन्ही अयोग्य
Previous Post Next Post