Home प्रश्नसंच - ५८ [भूगोल] bySunil Jadhavar •February 27, 2014 0 प्र १.} नेवेली कोळसा क्षेत्र कोणत्या राज्यात आहे ? A. आंध्रप्रदेश B. कर्नाटक C. केरळ D. तामिळनाडू उत्तरासाठी येथे क्लिक करा. D. तामिळनाडू प्र २.} स्वातंत्र्योत्तर काळात मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणते बंदर सर्वप्रथम बांधण्यात आले ? A. न्हावाशेवा [JNPT] B. कांडला C. मार्मागोवा D. मुंब्रा उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. कांडला प्र ३.} अंदमान समुद्रातून दक्षिण चीन समुद्राकडे जाताना कोणती सामुद्रधुनी लागते ? A. पाल्क B. जिब्राल्टर C. मल्लाक्का D. बिअरिंग उत्तरासाठी येथे क्लिक करा. C. मल्लाक्का प्र ४.} खालीलपैकी कोणते बंदर मलेशिया देशाशी संबंधित नाही ? A. ब्रुनेई B. मलाया C. सेहाद D. सारवाक उत्तरासाठी येथे क्लिक करा. A. ब्रुनेई प्र ५.} 'इल्मेनाईट' हे खनिज उत्पादन करणारे प्रमुख राज्य कोणते ? A. आंध्रप्रदेश B. कर्नाटक C. केरळ D. तामिळनाडू उत्तरासाठी येथे क्लिक करा. C. केरळ [इल्मेनाईट हे Iron titanium oxide mineral आहे. जे मुख्यत्वे केरळमध्ये सापडते] प्र ६.} खाली दिलेल्या नद्यांपैकी कोणत्या नदीचा त्रिभुज प्रदेश मोठा आहे ? A. हो-हॅंग-हो B. नाईल C. इरावती D. मिसिसीपी उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. नाईल प्र ७.} लोकतक जलविद्युत निर्मिती क्षेत्र कोणत्या राज्यात आहे ? A. मेघालय B. मिझोरम C. त्रिपुरा D. मणिपूर उत्तरासाठी येथे क्लिक करा. D. मणिपूर प्र ८.} 'शॉन'चे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे ? A. कंबोडिया B. थायलंड C. व्हिएतनाम D. म्यानमार उत्तरासाठी येथे क्लिक करा. D. म्यानमार प्र ९.} अयोग्य विधाने ओळखा. अ] महाराष्ट्र हा शेंगदाणा तेल उत्पादनात अग्रेसर राज्य आहे. ब] भारताला १०% कागद आयात करावा लागतो. पर्यायः- A. फक्त अ B. फक्त ब C. वरील दोन्ही D. एकही नाही उत्तरासाठी येथे क्लिक करा. A. फक्त अ प्र १०.} भारताच्या इतर किनारी भागांपेक्षा सौराष्ट्राचा किनारी भाग मत्स्य व्यवसायासंबंधी कमी विकसित आहे, कारण......................... A. तेथील किनारी भागात पाण्याची क्षारता जास्त आहे. B. औद्योगिक विकासामुळे जल प्रदूषणात वाढ झाली आहे. C. मत्स्य व्यवसायासंदर्भात तेथील लोकांत जागरूकता नाही. D. तेथील लोक कृषी आणि पशुपालन व्यवसायावर जास्त भर देतात. उत्तरासाठी येथे क्लिक करा. D. तेथील लोक कृषी आणि पशुपालन व्यवसायावर जास्त भर देतात. Facebook Twitter