Home प्रश्नसंच - ५९ [अर्थशास्त्र] bySunil Jadhavar •February 28, 2014 0 प्र १.} देशाच्या स्थूल देशांतर्गत उत्पन्नात महाराष्ट्र राज्याचा वाटा किती आहे ? A. १४.९% B. २०.१% C. ०२.०२% D. १८.९% उत्तरासाठी येथे क्लिक करा. A. १४.९% प्र २.} २००९-१० मधील निकषानुसार भारताचे दरडोई प्रतिमाह ग्रामीण आणि शहरी उत्पन्न अनुक्रमे [अंदाजे] किती आहे ? A. ३०० रु. , ४०० रु B. ५६५ रु. , ८७९ रु. C. ६७२ रु. , ८५९ रु D. ९५४ रु. , १००४ रु. उत्तरासाठी येथे क्लिक करा. C. ६७२ रु. , ८५९ रु प्र ३.} २००९-१० च्या सुरेश तेंडूलकर समितीच्या अहवालानुसार महाराष्ट्रात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण किती आहे ? A. ३८.२% B. २४.५% C. ४८.३% D. १८.७% उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. २४.५% प्र ४.} कोणत्या योजनेमध्ये बदल करून जवाहर ग्राम समृद्धी योजना सुरु करण्यात आली ? A. जवाहर रोजगार योजना B. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना C. १ आणि २ दोन्ही D. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना उत्तरासाठी येथे क्लिक करा. A. जवाहर रोजगार योजना प्र ५.} १ एप्रिल १९९९मध्ये सहा योजनांचे एकत्रीकरण करून स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना सुरु करण्यात आली. खालीलपैकी कोणती योजना त्या ६ योजनांपैकी नाही. A. IRDP B. TRYSEM C. DWCRA D. ICDS उत्तरासाठी येथे क्लिक करा. D. ICDS प्र ६.} योग्य विधाने ओळखा. अ] १९९९-२००० ते २००७-०८ या कालावधीत देशाच्या मानव विकास निर्देशांकात २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ब] १९९९-२००० ते २००७-०८ या कालावधीत महाराष्ट्राच्या मानव विकास निर्देशांकात १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पर्यायः- A. फक्त अ B. फक्त ब C. एकही नाही D. वरील दोन्ही उत्तरासाठी येथे क्लिक करा. D. वरील दोन्ही प्र ७.} सहस्त्रकालीन चिकास उद्दिष्ठासंबंधी अयोग्य विधाने ओळखा. अ] १९९० ते २०१५ दरम्यान राष्ट्रीय दारिद्र्य रेषेखालील लोकांचे प्रमाण निम्म्यावर आणणे. ब] १९९० ते २०१५ दरम्यान पाच वर्षाखालील बालमृत्यूचे प्रमाण दोन तृतीयांशने कमी करणे. पर्यायः- A. फक्त अ B. फक्त ब C. एकही नाही D. वरील दोन्ही उत्तरासाठी येथे क्लिक करा. C. एकही नाही प्र ८.} अयोग्य विधाने ओळखा. अ] राज्य शासनाने २००५ साली राजकोषीय उत्तरदायित्व व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन अधिनियम पारित केला. ब] मागील काही वर्षांमध्ये महसुली तुटीचे स्थूल राज्य उत्पन्नाशी असलेले प्रमाण २००७-०८ वर्षी सर्वात कमी होते. पर्यायः- A. फक्त अ B. फक्त ब C. एकही नाही D. वरील दोन्ही उत्तरासाठी येथे क्लिक करा. C. एकही नाही प्र ९.} महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ खालीलपैकी कोणते कार्य करते ? अ] हस्तकला कारागिरांना मदत. ब] लघु उद्योगांना आयात निर्यातीसाठी मदत. क] पैठण व येवला येथे दोन पैठणी केंद्र चालवते. पर्यायः- A. फक्त अ आणि ब B. फक्त ब आणि क C. फक्त अ आणि क D. वरील सर्व उत्तरासाठी येथे क्लिक करा. D. वरील सर्व प्र १०.} भांडवल बाजारासंबंधी योग्य विधाने ओळखा. अ] भांडवल बाजारात मध्यमकालीन तसेच दीर्घकालीन कर्जाच्या देवाण-घेवाणीचे व्यवहार चालतात. ब] या बाजारात उद्योजक व्यावसायिक या बाजारात शेअर्स, बॉन्डस वगैरे विकून भांडवलाची उभारणी करतात. क] भांडवल बाजार हा फक्त शुक्रवारी जिल्ह्याच्या ठिकाणी भरतो. पर्यायः- A. फक्त अ आणि ब B. फक्त ब आणि क C. फक्त अ आणि क D. वरील सर्व उत्तरासाठी येथे क्लिक करा. A. फक्त अ आणि ब Facebook Twitter